Sunday, April 1, 2018

कधी कधी खोटे बोलावे लागते.

आयुष्यात कधी ना कधी खोटे बोलावे लागतेच. न कचरत बोला. हे बर्‍याच जणांनी पूर्वी सांगितले आहे मीसुद्धा सांगतो. लोभ असावा.

उदाहरणार्थ, आज मंडईत कांदे घेताना, त्या मावशींनी, सुट्टे नाहीत का? असे विचारले. माझ्याकडे होते पण मी नाहीत म्हणालो कारण, कांदेबटाटे घेताना बंदे रुपयेच द्यायचे असतात असा एक अलिखीत नियम आहे. (आले का परत अलिखीत नियम).
 शिवाय मला पुढे कोथिंबीरीला सुट्टे लागणार होते. 
शिवाय++ त्या मावशींच्या पोत्याखाली चिक्कार सुट्टे पैसे दिसत होते.
अशी सगळी कारणमीमांसा असताना, खरे बोलायचे म्हणजे, त्यांना ही सगळी कारणे सांगून, म्हणून मी तुम्हाला सुट्टे पैसे देवू शकत नाही असे म्हणावे लागले असते. काय अर्थ आहे का?
आपला युधिष्ठीर हिरो, कधी मंडईत गेला नसेल.

No comments:

Post a Comment